micro irrigation scheme सरकारने शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत २५३ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी “राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक” या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेतील खर्चामध्ये केंद्र सरकारचा ६०% वाटा आहे, तर उर्वरित ४०% खर्च राज्य सरकारने उचलला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे.
लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खाली दिलेली माहिती वाचा.
micro irrigation scheme
या अंतर्गत 2024-25 मध्ये लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यामधून पहिल्या टप्प्यात २५३ कोटी ८४ लाख रुपये वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निधीचे वितरणाचे स्वरूप :micro irrigation scheme
सामान्य प्रवर्गासाठी: २१३ कोटी १४ लाख रुपये
अनुसूचित जातींसाठी: २२ कोटी ७२ लाख रुपये
अनुसूचित जमातींसाठी: १७ कोटी ९८ लाख रुपये
या प्रकारे अनुदान दिले जाणार आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधी मंजूर, सविस्तर माहीती
या योजनेचा लाभ कसा मिळणार?
महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदानाचा लाभ सहज मिळेल. micro irrigation scheme
योजनेची अंमलबजावणी आणि रखडलेले अनुदान:
२०१५-१६ पासून “प्रति थेंब अधिक पीक” ही योजना राबवली जात असून, त्याअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. परंतु, अनेक वेळा अनुदान उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी आंदोलनही केले. या समस्येच्या निराकरणासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती.
शेतकऱ्यांना या यातून मिळणार दिलासा :
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे २०२४-२५ या वर्षात शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी वेळेवर अनुदान मिळण्याची व्यवस्था झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
सूक्ष्म सिंचन योजना
- मायक्रो इरिगेशन हे एक जलसंवर्धन पद्धत आहे ज्यामध्ये पिकांना थेट मुळांपर्यंत किंवा आसपास पाणी पुरवले जाते. यामुळे पाणी बचत होते आणि उत्पादन वाढते. मायक्रो इरिगेशनच्या काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- पाण्याची बचत: मायक्रो इरिगेशनमुळे पाणी थेट मुळांपर्यंत जातं, ज्यामुळे पाणी वाया जात नाही.
- समान पाणी पुरवठा: पिकांना समान प्रमाणात पाणी मिळते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते.
- कमीत कमी किटकनाशकांचा वापर: या पद्धतीमुळे पिकांचा किटकनाशकांशी संपर्क कमी होतो, ज्यामुळे पर्यावरणावर कमी परिणाम होतो.
- खतांचा प्रभावी वापर: पिकांना थेट खतांचा पुरवठा केल्यामुळे खतांचा वापर अधिक प्रभावी होतो.
- शेतीतील खर्च कमी होतो: पाणी, ऊर्जा आणि वेळ यांची बचत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
- मायक्रो इरिगेशन पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, ती कमी पाणी असलेल्या आणि पिकांच्या वाढीला मदत करणाऱ्या क्षेत्रांसाठी आदर्श ठरते. micro irrigation scheme
नवनवीन शेती उपयोगी माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा 👉क्लिक करा